अभिनव महाविद्यालयाचा बारावीचा निकाल शंभर टक्के   

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत आंबेगाव बु येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचा शंभर टक्के तर वाणिज्य विभागाचा ९९ टक्के निकाल लागला आहे.
 
कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान विभागामध्ये अर्णव काटेपल्लेवार ९३ टक्के गुण मिळवून प्रथम, अवनी धामणे हिने ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर उत्कर्ष माने हिने ९० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागामध्ये कनिष्क देशमुख हिने ८९ टक्के हिने गुण मिळवून प्रथम ,सक्षम शेट्टी याने ८४.०० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अनुष्का पाटील हिने ८२.३३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.   
 
कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी दररोजच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शंकांचे वेळोवेळी निरसन केल्याने त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन केल्यानेच आम्ही चांगले गुण मिळवू शकलो असे विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. बारावीच्या परीक्षेत उत्तुंग निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखल्याबद्दल  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप, खजिनदार ध्रुव जगताप, समन्वयक डॉ.सविता शिंदे, प्राचार्या वर्षा शर्मा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सुनीता यादव कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले आहे. 

Related Articles